• Fri. Jun 9th, 2023

महात्मा गांधी

ByGaurav Prakashan

Feb 6, 2021
    होते महात्मा गांधीजी
    म्हणून देश झाला स्वतंत्र.
    छातीवरती गोळ्या झेलून
    वापरला अहिंसेचा तंत्र….
    खादी,चरखा ताकत होती
    अवजार होता सत्याग्रह.
    स्वातंत्र्याचा एकच ध्यास
    स्वतःसाठी नव्हता आग्रह……
    कधी न केली हिंसा बापूने
    अहिंसेचा होता पुजारी.
    महात्म्याचे स्वर निघाले
    मुखा मुखातुन प्रत्येक दारी….
    मिठाच्या सत्याग्रहाने
    बळ मिळाले देशाला.
    कर्तृत्ववान त्या गांधीजींच्या
    सलाम करतो नेतृत्वाला
    बापूच्या फोटोने दिशा दाखवली
    भारत देशाच्या चलनावर.
    गुलामगीरीच्या पाषानातून
    स्वतंत्र झाले मग वळणावर.
    जागृत केला सारा समाज
    समानतेचा मार्ग दिला.
    गोर गरीबांची हाल पाहुन
    आजही आठवते गांधींजी मला..
    सौ.संगिता देवेंद्र बांबोळे
    चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *