नागपूर : रोजगारासाठी गावाकडून शहरांकडे येणारे तरुण रोखण्यासाठी ग्रामोद्योग, कुटिरोद्योग आणि लघु उद्योग गावांमध्ये सुरू झाले पाहिजेत. तसेच देशातील साडेसहा लाख गावांमध्ये प्रत्येक गावांत २५ तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देऊ असा संकल्प करून देश आत्मनिर्भर बनवा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
खादी ग्रामोद्योग आयोग आणि आदिवासी विकास विभाग यांच्यात मंगळवारी दोन सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा, एमएसएमई राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी, आदिवासी विकास मंत्री रेणुका सिंग, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना, आदिवासी विकास विभागाचे सचिव दीपक खांडेकर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या दोन्ही विभागात झालेला हा ऐतिहासिक सामंजस्य करार असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले, खादी ग्रामोद्योग आयोगाने ३ लाख शाखा सुरू केल्या आहेत. २४ लाख लोकांना यामुळे रोजगार मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण आणि मागास-आदिवासी क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याचा यातून प्रयत्न आहे. गायीच्या शेणापासून पेंट, मधावर आधारित उद्योग, बांबूपासून बांबू साहित्याचे उद्योग आदिवासी क्षेत्रात निर्माण झाले तर महिला व युवकांना आदिवासी क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतील, या प्रयत्नातून हा करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023